Friday, September 16, 2011

वेडेच इतिहास घडवतात.. आणि अण्णा वेडे आहे..


खबरदार जर तुम्ही भ्रष्टाचार विरुद्ध बोलत असाल, उपोषण करत असाल, किंवा वंदे मातरम म्हणत असाल तर तुम्ही  जातीय वादी आहात तुम्हाला जातीयवादी संघटना साथ देत आहे (मग ती संघटना देशभक्त का असोना ) आणि भारतात हिंदू संघटनानाच जातीयवादी म्हटलं जात बाकी इतर  जातीयवादा च्या आधारावर उभारलेल्या  संघटना  ह्या धर्मनिरपेक्ष आहेत. ह्याच्या हि पुठे जाऊन जर  खालील प्रकारची पत्र तुम्ही सरकार ला पाठवत असाल तर मग तुम्ही वेडे आहात आणि देश द्रोही आहात हे लक्षात ठेवा.
सध्या असाच काही प्रकार आपल्या देशात सुरु आहे, महाराष्ट्रातल एक अस व्यक्तिमत्व ज्याचं नाव "कि.बा.हजारे" आहे ज्यांना लाडाने अण्णा म्हणतात, उपहासाने छोटा गांधी आणि टीकेने वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून संबोधल जात ते छोट वादळ आज आपल्या केंद्र सरकार ला जाऊन भिडलंय.

Friday, August 19, 2011

भ्रष्टाचाराचा भस्मासुर आणि अण्णाअस्त्र

           भ्रष्टाचाराची कीड हि सध्या संपूर्ण जगावर पसरली आहे. ह्या रोगाची लागण भारताला कधी झाली हे सांगण जरा कठीणच पण आज ती इतकी खोलवर रुजली आहे कि संपूर्ण समाज व्यवस्था ह्या रोगाने पोखरून टाकली आहे.ह्या भ्रष्टाचार-नावाच्या रोगा  साठी बरेच कायदे करून लसीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला पण काहीही उपयोग झालेला दिसला नाही. आता हा साधा रोग राहिला नसून त्याने महाकाय रूप धारण केल आहे. काल पर्यंत लहान सहान ठिकाणी छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार सगळी कडे होता. पण आज घोटाळ्यांचे आकडे बघितले तर आकडी येईल. रोज नवी बातमी, ४०० कोटी चा घोटाळा, 7०० कोटी, १००० कोटी, १लाख कोटी या वरूनच कळत की हि साधी कीड भस्मासुर बनली आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आज आ-वासून उभा आहे, आणि आपल्या हक्काची आणि कष्टाची कमाई गिळंकृत करण्यासाठी तत्पर उभा आहे.

Wednesday, August 10, 2011

सोन्याच अंड देणारी कोंबडी विकून टाकली

महानगरांमध्ये जिथे खास करून झपाट्याने विकास होत चाललाय अश्या ठिकाणी रिकाम्या जमिनींना, शेताला सोन्यापेक्षा हि जास्त किंम्मत मिळु लागली आहे. एकराने विकल्या जाणार्या जमिनी आज गुंठ्यांनी विकल्या जात आहेत. हीच बाब आज पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळती आहे. विद्देच माहेर घर असलेल  पुण आता IT क्षेत्रालाही भुरळ घालू लागल आहे.
बघता बघता हिंजेवाडी, मगरपट्टा, तळेगाव, औंध ह्या काही गावां मध्ये IT पार्क उभे राहिले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत तर पुण्याच आकर्षण पहिले पासून आहेच, रोज गल्ली बोळां मध्ये एक नवी शिक्षण संस्था जन्मास येते. त्यामुळे इथे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी दररोज येणारांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणून प्रत्येक IT पार्क आणि शिक्षण संस्थाच्या आजु बाजु च्या परिसरासरांच्या किंम्मती उच्चांक गाठतात. लोखंडाच परिसाच्या स्पर्शाने सोन व्हावं तस ह्या IT पार्क आणि शिक्षण संस्था सारखे पारीस जमीनीच सोन करत आहेत.
ह्यामुळे शेतकरी शेतीला कंटाळले कि पैशाला हपापले हे कळत नाही, पश्चिम  महाराष्ट्रातला

Monday, May 2, 2011

Storie of Life

मनाचे मनाशी जुळलेले नाते..
सदैव गीत प्रेमाचे गाते..
ह्या बेधुंद मनाच्या लहरी मधे भिजावं.. मना मनात प्रेमाच बीज रुजाव. कधी गोड कधी कडु आठवणीन
मधे हरवून जाव.. ह्या पेक्ष्या वेगळ आयुष्य ते काय आहे? अश्याच काही जीवनातील रसाळ आठवणींचा संग्रह "Storie of Life"
हा नवीन सादर घेऊन येतोय.. वाचा निरनिराळ्या कथा आवडल्यास दाद द्यायला विसरू नका.
सुरवात करतोय एका English Love Story ने.
Episodes of Love story...Hope u like it...Will try to send each week one episode...
Cute love story arrives!!!!… surely it will hit you!!!… enjoy it!!!!…

Tuesday, March 15, 2011

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा. गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा या पेक्षा ते आणखी काय वर्णन करणार माझ्या महाराष्ट्राच. संताच्या वाणीने आणि शिवबाच्या कर्तुत्वाने पावण झालेली ही पतित पावन महाराष्ट्र भुमी. जेव्हा महाराष्ट्रा बद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला आठवतात ते "संयुक्त महाराष्ट्र चळवळी चे दिवस". होय भारत स्वातंत्र्या नंतरही महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हत. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अनेक प्रांतात विभागलेला होता, विदर्भ हा प्रांत मध्यप्रदेश मधे तर मराठवाडा हैदराबाद च्या निजामशाही मधे तर मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र गुजरात प्रंतामधे विभागलेले होते. आणि बेळगाव हे कर्नाटक (म्हैसुर प्रांत) मधे जे अजुनही तिथेच आहे. या विभागलेल्या विभक्त महाराष्ट्राला संयुक्त करण्यासाठी छत्रपतिंच्या लेकरानी कंबर कसली आणि लाखो गीरणी मजदुर, कामगार आणि दलित वर्गानी एकत्र येवून हा लढा कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदती शिवाय सुरु केला, त्याचं नेतृत्व करायला कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे(बाळासाहेब ठाकरेंचे वडील) ,शाहिर अण्णाभाऊ साठे ई. मंडळी सरसावली होती. १९५५-५६ पासुन सुरु झालेला हा रणसंग्राम तब्बल ५ वर्षे चालला आणि २१ नोव्हेंबर १९५९ रोजी १०५ हुतात्म्याच्या प्राणाची आहुती घेऊन थांबला. आणि कामगार नेते "श्रीपाद
अमृत डांगे" यांची मागणी माण्य होऊन संयुक्त महाराष्ट्राच स्वप्न १ में १९६० "जागतिक कामगार दिनी" सत्यात उतरल, तरी बेळगाव च स्वप्न मात्र भंगल, त्या वेळचा नारा होता कि बेळगाव-मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. परंतु गुजरात पासुन मुंबई आणि कर्नाटक पासुन बेळगाव मिळवणे म्हणजे फार मोठी कसरत होती, जवाहरलाल नेहरू सरकार दौभाषिक राज्यावर ठाम होत, मग अश्या वेळेस निर्णय झाला कि आधी मुंबई घेऊ बेळगाव येईलच, म्हणजे "आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे" परंतु लग्नाची वाट बघत रायबा(बेळगाव)म्हातारा झालाय. जरी आज बेळगाव महाराष्ट्रात नसेल तरीही महाराष्ट्र रुबाबात, मोठ्या दिमाघात उभा आहे. पण बेळगाव नसल्याची खंत अजुनही जाणवते.