Tuesday, December 28, 2010

James Lane जिंकला का?

                कोणाला शिव्या येतात का हो शिव्या, इथे लिहिता येत नाही म्हणून, तुम्हाला येत असतील तर लगेच देऊन टाका, पुण्यातल्या भ्याड राज्यकर्त्याना हव्या आहेत.
जागे व्हा...जागे व्हा, आपल अक्कलशून्य आणि स्वार्थी सरकार आपल्याला अंधारी गुफेत घेउन चालले आहे...
आपली भ्रष्टाचाराची कारस्थान लपवण्यासाठी नव नवीन उद्योग सुरु आहेत.
कधी राम, कधी कृष्ण, तर कधी शिवाजी.. अहो तुम्हाला Problem काय आहे ह्यांच्या पासून.
मागे हे सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरुण हिंद महासगाराताला राम सेतु तोडायला निघाले होते. अमेरिकेने सांगितले की आमच्या बोटी श्रीलंकेला वळसा मारून जातात हजारो लिटर इंधन जळत तुम्ही तो सेतु तोडून टाका आम्हाला Short Cut होइल. आणि "Pizza वाली बाई" (सोनिया गाँधी) तयार झाली, अनेक हिंदुत्ववाद्यानी विरोध केला तर हे म्हणाले "राम म्हणून कोणी नव्हताच ते एक काल्पनिक पात्र आहे" माजी राष्ट्रपति A.P.J.Abdul KAlam ह्यांचा ही सेतु तोडायला विरोध होता. ते म्हणाले या सेतु मधे लाखो टन थोरियम आहे ज्या पासून भारत स्वावलंबी होऊ शकतो. तरी बाई काही येकेना. नशीब बर्याच विरोध आणि अंदोलना नंतर "राम सेतु" वाचला.
         पण आमच्या लाडक्या शिवबा च काय? त्याचा तर अख्खा इतिहासच बदलायला निघाले आहेत, त्याचेच मावले.
कोण्यातरी शोध लावला की म्हणे शिवबा चे गुरु हे "दादोजी कोंडदेव" नव्हते तर ते "संत श्रेष्ठ तुकाराम महाराज" होते. हो आपण हे मान्य ही करू की "संत श्रेष्ठ तुकाराम" हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. पण ते दादोजी सारखे शिवबा ला तलवार, दांडपटटा, कसे शिकवू शकणार? काही तरी logic तर लावा जरा. उगाच दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्याचा द्वेष...

Friday, December 24, 2010

मतांच्या राजकारणात हिंदू झाला बदनाम

कांद्याचा भाव १०० रुपये किलो, लसून ३००, पेट्रोल ६३ रु. लिट, हा भाव सागळयांसाठी सारखा आहे की, हिंदू साठी अलग आणि मुस्लिमान साठी अलग आहे का? नाही ना..! सागळयाना ही झळ सारखीच बसती आहे, "आदर्श" मधले flats हे हिंदू सैनिकाना मिळणार होते की मुस्लिम, CWG मधे हिंदू धावणार होता की मुसमान, 2G Spectrum घोटाळयाची तर आकडेमोड जरी केली तरी "आकडा" येइल.
या सगळया गोष्टीवरुन लक्षात येत की खरच अपल सरकार हे Secular म्हणजेच "धर्मनिरपेक्ष" आहे. कुठल्या ही जाती, धर्माचा विचार ना करता त्यांनी व्यवस्थित पीळवाणुक चालवलेली आहे. सकरकारच ध्येयच आहे की GDP ८% पर्यंत जरी नाही गेला तरी चालेल पण "आम आदमी" हा आमच राहिला पाहिजे. त्याची जर प्रगति झाली तर तो विचार करायला लागेल, आणि विचारी माणस त्याना कधीच मतदान करणार नाहीत.
आता स्वत: च बिंग फुटायला लागले, घरात मवाणार नाही एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार करुन झालय, आणि आता तो "आम आदमी" च्या समोर उघडा पडल्यावर सावरा सावर करण्या ऐवजी, त्याच डोक कस फिरवता येइल, त्याला रिकाम्या कामत कस गुंतवता येइल याची कारस्थान आमच सरकार करतय.
अयोध्या निकाला नंतर परत दंगली तर उसळणार नाही ना, या भीतीत सगळे होते, परंतु सपूर्ण देशात हिंदू व मुस्लिमानी सलोखा राखला, आणि एक वेगळच उदाहरण या जगा समोर ठेवल. परंतु हे या
सरकार ला पचलेल दिसत नाही. प्रतेक वेळेस Bomb Blast होतात कधी मंदिर तर कधी मज्जिद
हदारते तरी सुद्धा हिंदू मुस्लिम भांडत का नाहीत? याची सल त्याना लागलेली दिसत आहे. कारण
आता पुढच्या निवडणुकित हाच मुद्दा त्याना कमी पडणार आहे, कारण विकास तर त्यांनी काही केला नाही, उगाच भ्रष्टाचाराचा डोंगर रचून ठेवला आहे.
आम्ही किती चांगले हे ते जाणतेला दाखउ शकत नाही म्हणून, बाकीचे आमच्या पेक्षा कसे वाईट आहे हे सांगण्यात त्याना जास्त रस वाटतोय.

Saturday, November 27, 2010

वसतिगृहाच्या आठवणी..

       वसतिगृह,  प्रतेकाने जीवनात अनुभवाव अस एक ठिकाण. इथे अनेक ठिकाण ची अनेक व्यक्ति तुम्हाला बघायला मिळतिल. इथे  येणारा प्रत्येक व्यक्ति आपल्या मनात एक नवीन स्वप्न घेवून दखल होतो. स्वप्ना बरोबरच मनात एक भीती ही असते, ती म्हणजे घरापासून दूर रहाण्याची आणि तिथले इतर विद्यार्थी आपल्याशी कसे  वागतील याची. परंतु काही दिवसांनी ही भीती तर दुर होतेच पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत त्यांच्यातलाच एक हिस्सा  झालेलो असतो. नंतर सुरु होतो तो नवीन आयुष्याचा प्रवास नवी स्वप्न नवी आशा उराशी बाळगुण.
प्रत्येक विद्यार्थी इथे एक वेगळच स्वप्न घेवून आलेला असतो इथे आल्यावर त्याच्या स्वप्नाना पंख फुटतात एक दिशा मिळायाला सुरुवात होते. पण कधी कधी काही वेगळच घडत,  एखादा स्वप्न एक बघतो परंतु ध्येय काही तरी निराळ असत आणि खर्या आयुष्यात बनतो मात्र कहीतरी अलगच. पण हे काही असल तरी वसतिगृहाच्या आठवणी आणि अनुभव मात्र जीवनभर सोबत रहातात.
          अश्याच काहिश्या आठवणीनी भरल होत माझही वसतिगृह, आजही जेव्हा ती मस्ती, तो धिंगाना,
आणि ती परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता आठवाते तेव्हा अंगावर शाहरा उभा राहतो. अस वाटत की अजुनही थोड़ी मस्ती बकिच आहे, जर खरच वेळ थोड़ा मागे घेउन जाता आला असता तर.

Wednesday, November 24, 2010

विदर्भ वेगळाच पडला शेवटी...

                                                                         
विदर्भ वेगळा मागणार्या विदर्भ वाद्यानीच विदर्भाला वेगळ पाडलेल दिसतंय. एक सांगा विदर्भ वेगळा झाल्यावर खरच विदर्भाचा विकास होणार काय? शेवटी विषय उरतो काय तर, कसा हि होवो पण विकास झाला पाहिजे. बर विदर्भ वेगळा झाल्या वरच त्याचा विकास होणार आहे का? तसच असेल तर मग खुशाल होऊन जाऊ द्या, पण याची शास्वती जो घेणार असेल त्याणेच पुढे यावे.
काय तर म्हणे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांना आणणार, त्याची मदत घेतली जाइल नवीन राज्य आणि प्रशाषण स्थापण्यासाठी. आहो ज्याना भारतीय प्रशाषनच मान्य नाही, ज्या गोष्टी विरुद्ध त्याचा लढा आहे त्याच्याच स्थापणे साठी त्याची मदत घेणार, मग खरच विचार करा ते प्रशाषण कस असेल आणि किती दिवस टिकेल? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खरच विदर्भाच्या विकासा साठी विदर्भातील नेते कार्यशील आहेत का?
नुकताच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावी "आर्णी (यवतमाळ)" गेलो होतो. आमच्या मतदार संघातील नवीनच असलेले पण राजकारणात जुने असलेले मात्तबर असे नेते आमदार म्हणून मिळाले आहेत जे आता सध्या मंत्रिमंडळात मंत्री पद भुषवतायेत मा. शिवाजीराव मोघे, हे आमच्या मतदार संघाला मिळालेलं आत्तापर्यंतच एकमेव मंत्रिपद, पण तेही सध्या डगमगत्या स्थितीत आहे. आजच "सकाळ" मधे बातमी वाचली की "पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या किमान दहा चेहऱ्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्‍यता आहे. अकार्यक्षमतेमुळे सुभाष झनक, शिवाजीराव मोघे अशा काही नावांचा समावेश मंत्रिमंडळात होणार नसल्याचा अंदाज आहे."
आसाच अकार्यक्षम कार्यभार साधाल्या जात असेल तर कसा होणार विकास.  जर इच्छा आणि दूरदृष्टि

Saturday, October 16, 2010

परकीय भाषेतून कमाई....

भाषेचा उगम हा पाषाण युगा नंतर झाला,
अस मी कुठे तरी वाचल होत. पाषाण युग म्हणजे (Stone age).
आदी-मानव सुरवातीला खानाखुना करुन म्हणजे Sign Language मधे बोलायचा, नंतर हळू हळू संभाषणा साठी भाषेचा वापर होऊ लागला. वेगवेगळ्या जागे नुसार, संस्कृती नुसार त्याचा विकास होत गेला. आज जगात किती तरी भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. बाकी जागाच राहू द्या बाजूला, आपल्या भारतातच बघाना प्रत्येक प्रांतात एक भाषा आणि प्रत्येक ५० किमी. नंतर त्याच भाषेची वेगळीच लय दिसून येते, उदा. महाराष्ट्रात मराठी एकच  भाषा पण किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. विर्भातली "वर्हाडी", कोकणातली "कोकणी,मालवणी", खानदेशातली "खानदेशी मराठी" मराठवाड्यातही एक वेगळाच लय एकायला मिळतो मराठीचा, त्यानंतर येते ती मुंबई ची "बंबईया मराठी", आणि पुण्याची "शुद्ध पुणेरी मराठी" ई.
   जस की मी वर लिहले की भाषेचा वापर हा संभाषणा साठी व्हायचा, आजही त्याच साठी होतो, पण आज त्या व्यतिरिक्त भाषेचा वापर पैसा कमावान्या साठी ही केला जाऊ शकतो. होय, कुठलीही परकीय भाषा शिका आणि "Transalator", "Dictator" म्हणून चांगल्या पगाराचा Job मिळवा. कामित कमी २००००/- हजार दर महा कमाऊ शकता...