आचाराने आणि विचाराने एक असणार्या ,हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्या व शिव-शंकराला कुलदैवत मानणार्या, वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर...
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे.
लिंगायत हा एक जात नसुन तो एक धर्म आहे . जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे न मानता ’विटाळाविण पिंडास न च आश्रय’ असे सांगून, असा बोध दिला आहे कि...
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या
हे विचार मांडणारे
महात्मा बसवेश्वर
यांचा जन्म
सन ११०५
या साली इंगलेश्वर
जे आज कर्नाटकातील
बिजापुर येथे आहे तेथील शैव ब्राम्हिण
कुटंबात झाला.
महात्मा बसवेश्वर हे
कर्नाटकातील संत
व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू
धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व
अन्य हानिकारक
प्रथांविरुद्ध संघर्ष
केला. त्यांनी
निर्गुण, निराकार
एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार
केला .
"काय कवे
कैलास" म्हणजेच "कर्म
हेच कैलास"
आणि “माणूस हा
त्याच्या जन्माने
नव्हे तर
समाजात केलेल्या
कर्माने मोठा
होत असतो”. अशी शिकवण
त्यांनी समजाला
दिली
महात्मा
बसवेश्वरांना परिवर्तन
हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून
आणायचे होते.
त्यासाठी एक
नवी जीवन
पद्धती त्यांनी
दिली. जेथे
शोषण नाही,
गरीब-श्रीमंत,
उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ
असा कुठलाही
भेदाभेद नाही,
कुठल्याही प्रकारची
विषमता नाही,
जाती-जमाती
भेद नाही,
कर्मकांड नाही,
अशा प्रकारची
जीवन पद्धत
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या
अलौकिक विचारधारेतून
अस्तित्वात आणून दाखवली.
महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक,
द्रष्टय़ा, सामाजिक
न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर
विरोध करणार्या निर्भय
विचारसरणीचा प्रभाव
समाजमनावर
पडला.
बाराव्या शतकात भारताचे
समाजजीवन हे
अंध:कारमय
झाले होते.अनेक रूढी,अंधश्रद्धा यांनी
त्रस्त झालेले
होते.
बहुदेवता उपासना, कर्मकांड,
अंधश्रद्धाo, पुरोहित
वर्गाची मतांधता,
पाप-पुण्याची
दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ-
कनिष्ठ, विषमता,
कामकरी-कष्टकरी
वर्गाची पिळवणूक,
स्त्री दास्यत्व
इत्यादींनी भारतीय
समाज बेजार
झाले होते.
अशा परिस्थितीत भारतीय
समाजाला उभे करण्याचे
धाडस महात्मा
बसवेश्वरांनी करून
दाखवले. त्यासाठी
त्यांना तत्कालीन
समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड
संघर्ष करावा
लागला.