Thursday, August 4, 2016

असे हे महात्मा बसवेश्वर...

आचाराने आणि विचाराने एक असणार्‍या ,हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्‍या शिव-शंकराला कुलदैवत मानणार्‍या, वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर...
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव  आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला  लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे.
लिंगायत हा एक जात नसुन तो एक धर्म आहे . जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे मानताविटाळाविण पिंडास आश्रयअसे सांगून,  असा बोध दिला आहे कि...
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या


हे विचार मांडणारे महात्मा बसवेश्वर यांचा जन्म सन ११०५ या साली इंगलेश्वर जे आज कर्नाटकातील बिजापुर येथे आहे तेथील शैव ब्राम्हिण कुटंबात झाला.
महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील संत समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला .
"काय कवे कैलास" म्हणजेच "कर्म हेच कैलास" आणि  “माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो”. अशी शिकवण त्यांनी समजाला दिली
 महात्मा बसवेश्वरांना परिवर्तन हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून आणायचे होते. त्यासाठी एक नवी जीवन पद्धती त्यांनी दिली. जेथे शोषण नाही, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ असा कुठलाही भेदाभेद नाही, कुठल्याही प्रकारची विषमता नाही, जाती-जमाती भेद नाही, कर्मकांड नाही, अशा प्रकारची जीवन पद्धत महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून   अस्तित्वात आणून दाखवली. 

महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्या निर्भय विचारसरणीचा प्रभाव समाजमनावर पडला. 
बाराव्या शतकात भारताचे समाजजीवन हे अंध:कारमय झाले होते.अनेक रूढी,अंधश्रद्धा यांनी त्रस्त झालेले होते.
बहुदेवता उपासना, कर्मकांड, अंधश्रद्धाo, पुरोहित वर्गाची मतांधता, पाप-पुण्याची दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, विषमता, कामकरी-कष्टकरी वर्गाची पिळवणूक, स्त्री दास्यत्व इत्यादींनी भारतीय समाज बेजार झाले होते. अशा परिस्थितीत भारतीय समाजाला उभे करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी करून दाखवले. त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड संघर्ष करावा लागला.

आपल्या मधले आंबेडकर जागवा...

भारत हा फक्त एक देश नसुन एक हजारॊ वर्ष जुनी संस्क्रुती आहे, अनेक चांगल्या, वाईट रुढी आणि  परंपरानी व्यापलेली.
परंतु ह्या उद्दात्त, उत्तम संस्क्रुतीला ग्रहण लागल ते जाती-पातीच, समता आणि विषमतेच.
ह्याची खरी उतपत्ती झाली ती वर्ण व्यवस्थेतुन.
भारतीय समाजाचे प्रमुख चार वर्ण
१. ब्राम्हिण (पुजारी,गुरु,शिक्षक)
२. क्षत्रिय (राजा, शाषणकर्ता, योद्धा)
३. वैश (शेतकरी, व्यापारी) आणि
४. शुद्र (मजदुर, सेवक)
शुद्र समाजाला ह्या वर्ण व्यवस्थेमधील प्रथम तिन म्हणजेच ब्राम्हिण, क्षत्रिय आणि वैश समाजाकडुन अमानवीय वागणुक दिली गेली.

अस्प्रुष्य म्हणुन त्याना समाजातुन सतत उपेक्षित ठेवल गेल.परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्या साठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याच आपण अनेक महकथा मधुन वचतो,
उदा. प्रभु रामचंद्रानी खाल्लेली शबरी चि उष्टी बोर असोत किंवा श्री क्रिष्णा ने खाल्लेले सुदामाचे पोहे.
त्यानंतरच्या काळात, संत कबीर, संत ग्यानेश्वर, संत तुकाराम महाराज ई. अनेक संत माहात्म्यानी आपल्या वांड.मयातुन समाज सुधारणेचा वसा जोपासला.
परंतु समाज मनाच्या मानसीकतेवर सखोल परीणाम होण्यासाठी येवठस पुरे नव्हत बहुतेक. कारण ह्या नतंर हि समाज व्यवस्था अशिच चालत गेली,
किंबहुना अजुन बिघडत गेली. शुद्र समजले जाणारे समाजातिल घटक हे सुध्दा मणुस आहे हे उच्चवर्णिय विसरलेत.

पंरतु ह्याच परिस्थितित एक सुभेदार महाराच्या घरी त्याच १४ व आपत्य जन्माला आलं. आणि त्यांनी संपुर्ण समाज व्यवस्थेला आणि ईतिहासाला हादरवुन सोडल.
ते होते भारतरत्न Dr. भिमराव रामजी आंबेडकर,

"बाबा साहेब", "महामानव", "युगपुरुष", "घटनाकार" अश्या अनेक नावांनी हा देश त्याना ओळखतो.
शाहीरानी खुप छान म्हटलय की, "उद्धारीली लाखो कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे."

बाबा साहेबांचा जन्म महु ह्या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला, त्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पिडित आणि शोषीतांच्य उद्धारा साठी वाहुन घेतल.
पण ह्या शोषित समाजाच्या उद्धारा साठी, न्यायासाठी आणि मानुस म्हणुन जगण्याच्या हक्कांसाठी ह्या मानवास महामानव म्हणुन घडत असताना जनावराच जिन जगाव लागल,
हे अपना सर्वांनाच माहीती आहे.
शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो कींवा उच्चशिक्षाणासाठी लंडन ला जातांनाची कसरत, येवठ पांडित्य ग्रहण करुनही नॊकरी च्या ठीकाणी मिळालेली हिन वागणुक असो..
हे सगळे प्रसंग झेलत स्वत: ला सिध्द करण्या साठी आणि त्याहुन हि अधिक समजाच्या संपुर्ण विकासासाठी ऎखाद्या अजींक्य योध्या प्रमाणे लढलेत आणि जिंकलेत.

Saturday, April 18, 2015

पुणे वाहतूक

 
पुणे तिथे काय उणे असे म्हणुन उणेकर (माफ करा पुणेकर असं लिहायचं होत),
तर "पुणेकर" स्व:ताचिच पाठ थोपटून घेतात. परंतु  पुण्या मधेही काहीतरी उणे आहेच हे पुणेकरांनी हि मान्य करायला हवं, ते म्हणजे पुण्याची बेशिस्त वाहतूक व्यवस्था आणि बेशिस्त पुणेकर.
पुण्यात सध्या दोन पुणेकरांचे गट पडतात एक म्हणजे जुने पुणेकर आणि सध्या बाहेरून येउन पुण्यात स्थाईक झालेले नवीन पुणेकर. जेव्हा कोणि पुण्याला किवां पुणेकरांना बेशिस्त पुणेकर अस म्हणतो तेव्हा दोघेही एकमेकां कडे बोट दाखवून मोकळे होतात. आज पुणे शहाराच्या वाहतुकीची जी अवस्था आहे ती पाहून पुणे शहराला ही गुदमर्लेल्या  सारखा होत असेल. जगभरामध्ये वाहतुकी साठी नवीन नवीन गोष्टींचा वापर होऊ लागला आहे, Railway, Metro, Bullet Train, Intercity Water Transport, Private Jet. ईत्यादी अनेक गोष्टींनी प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरळित केलेली आहे. अनेकदा आपण वाचतो कि जापान मधे कंपनी चे CEO सायकल ने ऑफीस ला जातात, तर UK मधे Managers खाजगी वाहना ऐवाजी Metro किंवा इतर Public Transport चा  वापर करतो. परंतु हिंजेवाडी च्या रस्त्यावर बघाल तर साधा Team Leader सुद्धा कार मधुन जातान दिसेल. ह्याचा अर्थ आपण खुप प्रगत आहो किंवा आपल्या लोकांकडे खुप पैसा आहे अस काही नाही, हे फ़क्त आपल फ़सलेल Public Transport  म्हणुन हा पर्याय. PMPL च्या बसेस ची वाट बघत बसायच, ति आल्यावरही त्यात लोंबकणारे लोंढे हे पाहुनच मनात धस्स होत, त्यात बसायची हिम्मत होइलच अस नाही.
आणि पुण्यात Auto म्हणजे न बोललेला विषय, मिटर हे फ़क्त दिखाव्यासाठीच असतात. जरा लांब जायच असेल तर ५००-६००/- हा आकडा सांगुन मोकळे होतात. यायच तर या, नाही तर बसा "बस" ची वाट बघत. किंवा ६ सिटरAuto जे प्रत्येक ५मिनिटाला सवारी बसवण्यासाठी नाही तर कोंबण्या साठी थांबवत थांबवत नेतात, वर त्यांची मुजोरी ही सहन करवी लागते, म्हणुन आज पुण्यात प्रत्येक जण आपल खजगी वाहन वापरण जास्त सोईच मानतो, आणि अश्यानेच पुण्याच्या वाहतुकिचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

Sunday, April 12, 2015

Foreign Language (JLPT)





परकीय भाषेतुन कमाई हा लेख आत दृष्य स्वरुपात.
इतर व्हीडिओ बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा New Vedios