Friday, December 24, 2010

मतांच्या राजकारणात हिंदू झाला बदनाम

कांद्याचा भाव १०० रुपये किलो, लसून ३००, पेट्रोल ६३ रु. लिट, हा भाव सागळयांसाठी सारखा आहे की, हिंदू साठी अलग आणि मुस्लिमान साठी अलग आहे का? नाही ना..! सागळयाना ही झळ सारखीच बसती आहे, "आदर्श" मधले flats हे हिंदू सैनिकाना मिळणार होते की मुस्लिम, CWG मधे हिंदू धावणार होता की मुसमान, 2G Spectrum घोटाळयाची तर आकडेमोड जरी केली तरी "आकडा" येइल.
या सगळया गोष्टीवरुन लक्षात येत की खरच अपल सरकार हे Secular म्हणजेच "धर्मनिरपेक्ष" आहे. कुठल्या ही जाती, धर्माचा विचार ना करता त्यांनी व्यवस्थित पीळवाणुक चालवलेली आहे. सकरकारच ध्येयच आहे की GDP ८% पर्यंत जरी नाही गेला तरी चालेल पण "आम आदमी" हा आमच राहिला पाहिजे. त्याची जर प्रगति झाली तर तो विचार करायला लागेल, आणि विचारी माणस त्याना कधीच मतदान करणार नाहीत.
आता स्वत: च बिंग फुटायला लागले, घरात मवाणार नाही एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार करुन झालय, आणि आता तो "आम आदमी" च्या समोर उघडा पडल्यावर सावरा सावर करण्या ऐवजी, त्याच डोक कस फिरवता येइल, त्याला रिकाम्या कामत कस गुंतवता येइल याची कारस्थान आमच सरकार करतय.
अयोध्या निकाला नंतर परत दंगली तर उसळणार नाही ना, या भीतीत सगळे होते, परंतु सपूर्ण देशात हिंदू व मुस्लिमानी सलोखा राखला, आणि एक वेगळच उदाहरण या जगा समोर ठेवल. परंतु हे या
सरकार ला पचलेल दिसत नाही. प्रतेक वेळेस Bomb Blast होतात कधी मंदिर तर कधी मज्जिद
हदारते तरी सुद्धा हिंदू मुस्लिम भांडत का नाहीत? याची सल त्याना लागलेली दिसत आहे. कारण
आता पुढच्या निवडणुकित हाच मुद्दा त्याना कमी पडणार आहे, कारण विकास तर त्यांनी काही केला नाही, उगाच भ्रष्टाचाराचा डोंगर रचून ठेवला आहे.
आम्ही किती चांगले हे ते जाणतेला दाखउ शकत नाही म्हणून, बाकीचे आमच्या पेक्षा कसे वाईट आहे हे सांगण्यात त्याना जास्त रस वाटतोय.
तब्बल २ वर्षा नंतर त्याना करकरे साहेबाचा विचार येतो आणि लगेचच पुरावे ही सापडतात. काय साला आगाऊ पणा आहे. एक शाहिदाची ही अशी हेळसांड करावी, नको ते आरोप करुन त्यांच्या शहीद होंयावरच प्रश्नचिन्ह उभा करवा.
सागळया जणतेनी उघड्या डोळयानी २६/११ चा नंगा नाच बघितला त्यावेळी ह्यांच्या डोळयावर काय झापड़ लागली होती काय? "आम आदमी" च लक्ष ह्यांच्या करस्थानावरुण हटाव आणि धार्मिक मतभेद त्यांच्यात निर्माण व्हावे, आणि एखादी अनपेक्षित घटना घडलीच तर मग हे येतील सांत्वन द्यायला. Secularism चा ढोल वाजवायला, आहो पण आग लवली कोणी.?
तिकडे युराजांची पोल wikileaks ने उघडली आणि परत त्यांच्यावर  सावरा सावर करायची वेळ आली, युवाराजाना American Ambassador विचारतात की "तुम्हाला लष्करे-तैयबा पासून तुम्हाला किती धोका आहे" तर आमचे युवराज आपल्या अकलेचे तारे तोडत सांगतात की त्याच्या पेक्षा जास्त आम्हाला हुदुत्ववाद्यांकडून जास्त धोका आहे, म्हणजेच "संघ" "भाजप" कडून,
अहो, कोणी त्या युवाराजाना सांगा म्हणाव ते तुमच्या Election मधील धोक्या बद्दल नव्हते विचारत. आपल्या देशाला काही धोका आहे का हे विचारत होते. पण युवाराजानी उगाच त्यांची दिशाभूल करुन ठेवली American Government ला वाटणार, अरे ह्यांच्यात अंतर्गतच वाद दिसतायेत, ह्याना पकिस्तान पासून काही धोका नाही उगाच पकिस्तान बदनाम होतोय.
असच ह्यांनी सरळ सरळ फ़क्त स्वतः ची थेर लपवाण्यासाठी आणि अल्पसंख्याकाच्या मतांसाठी हिंदुना बदनाम करण्याच कारस्थान मजवालय. फक्त आता आमच्यात भांडण लाऊ नका म्हणजे मिळवल.

2 comments:

Anonymous said...

khup changla lihlay....
surwat khup chan hoti....
sory to say bt end kahi khas nhi watla....

Swapnil Demapure said...

Dhanyawad, pudhya weles nakki lakshyat thewel, ashyach suchana det raha...