Monday, December 2, 2019

एका आई चे कथन


मि कोणि मोठी लेखिका नाही, राजकारणी तर नाहीच नाहि, किंवा कुठल्या विषिष्ठ धर्माची Follower ही नाही.

मि फ़क्त माझ्या चिमुकली ची आई आहे, मला काळजी वाटते, भीती वाटते आणि असुरक्षित असल्याची सतत जाणीव होत राहते, आजच्या समजाच विदरक रुप बघुन. मला अस जाणवत कि आज समजात कुठलीच मुलगी, स्त्री किंवा लाहान मुलही सुरक्षित नाही.

आज मला social media आक्रोशाने भरलेले अनेक messages, posts बघायला मिळतात, तर कुणि whats app वर काळे DP ठेवुन निषेध नोंदवताना दिसतात. त्यातले अनेक तर मुळ मुद्दा सोडुन भावनिक आणि धार्मिक विषयावर टिप्पणी करणारे अधीक असतात.

पण ह्याहुन अधिक आपण करु तरी काय शकतो?
मेम्बत्त्या जाळा! petitions Sign करा! social media च्या पोस्ट शेर करा, आणि सरते शेवटि एखादा धर्मिक मुद्दा पेटवा.

परवा निर्भया होती, काल आसिफ़ा, आज डॊ. प्रियंका रेड्डी आहेत, उद्या अजुन कोणितरी असेल. परंतू परिस्थिती ही काल आज आणि उद्या ही तशीच दिसत आहे.

काय अजुन आपण अश्या एखाद्या घटनेची वाट बघतोय ? शांत बसने म्हणजे अश्या विक्रुत माणसिकतेला खतपाणी घालण्या सारख आहे.

हि एकच घटना नाही आहे, अश्या अनेक घटना सतत घडत आहेत, काही आपण विसरलो आहोत तर कितितरी घटना पुढेच आल्या नसतिल.

किंबहुना ज्या घटना पुढे आल्या आहेत, त्यातले किती  आरोपी सिद्ध झालेत किंवा जे सिद्ध झालेत त्यातल्या किती लोकांना कठोर शिक्षा झाली. कित्तेक वर्ष जातात त्यांना आरोपी ठरवायला  आणि त्यांनंतर शिक्षेचीअंमलबजावणी करायला.

हा कसला कायदा? अरोपीने गुन्हा कबुल केल्या नंतर ही सरकार आणि न्यायालयाना औपचारिक प्रक्रिया पुर्ण करावी लगते हे सांगण्या साठि की ते गुन्हेगार आहेत ही नाही.

सध्या पुरता जणतेचा आक्रोश शांत करण्यासाठी आरोपी ना फ़क्त तुरंगात डांबुन पिडितेला न्याय मिळणार का?

कुर्ग (भारतचे स्कोटलंड)


मला या निसर्गाने आणि त्याच्या सौंदर्याने नेहमीच आश्चर्यचकित केलय.
भारत हा जसा भाषा आणि संस्क्रुतीच्या विविधतेने नटलेला देश आहे,
तसेच निसर्गाने हि त्या सुंदरतेच्या विविधतेची उधळन मनसोक्त केली आहे.
जेव्हा कधी मला ह्या निसर्गाची पवित्रता अनुभवायची मिळते तेव्हा तेव्हा मन उचंबळुन येत.
तर अश्याच एका निसर्गाच्या सानिध्यातील सहलीला आम्हि निघालोय.

The South western part of कर्नाटक, जिथे निसर्गाने अशी काही जादु केली आहे जी आम्हि शहरांमधे हरवुन बसलोय. आम्ही निघालोय "कुर्ग" ला.

निसर्ग सौदर्य, स्थानिक स्वदिष्ट जेवन, आणि Coffee च्या झाडांची बंदिस्त सुगंध.
आरामदायी ट्रिप ला अजुन काय हवय?

आम्हि कुर्ग च्या दिशेने असताना अमच्या लिस्ट मधे पहिला स्टोप होता. बालेकुपे मधिल golden temple,
हि एक तिबेटियन मोनेस्ट्रि आहे, तिबेटियन संस्क्रुतिला भारतात एक वेगळेच महत्व आहे.
तिबेटच्या बहेरील हि मोनेस्ट्री दुसर्या क्रमांकाची आहे, या मंदिराची बांधनी आणि Structure खरच तुम्हाला inspire करुन जातं.

त्यानंतर आम्ही निघालो अमच्या दुसर्या stop कडे, "दुबारे Elephant camp" आणि वॉटर राफ्टिंग.
जिथे अम्हि जास्त मजा केली ति म्हणजे वॉटर राफ्टिंग, नदिच्या मधोमध जावुन पोहणं काय असत हे अम्ही तिथे  अनुभवलं.

ति धमाल अनुभवल्या नंतर अम्हि निघालो आमच्या Resort कडे निसर्गाच्या कुशीत असलेल्या या Resort मधे आम्ही मुक्कामी थांबलो, जिथे रात्र या विचारत जात होती कि सकाळी अजुन काय नवीन बघायला मिळणार.

सकाळी उठल्यावर तिथला परिसर बघुन मन प्रसन्न झाल. रात्री भयान अंधारातला हा Resort मात्र सकाळी सुर्यकिरणानी न्हावुन निघलेला परिसर मन सुखावुन गेला.

इथल्या अद्भुत जंगलात निस्र्गाचे अनेक मोती दडलेले आहेत, त्यातच ताठ मनेने उभ असलेल हे "थलकावेरी मंदीर". हे मंदीर कावेरी नदिच उगम स्थान, जिथे निसर्ग मोठया सुंदरतेने आपले रंग बदलत असतो.

त्याच्याच  पुढे  मेडेकरी गावापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे आबे फ़ॊल, जो Coffee बागांनी वेढलेला आहे आणि इथले कोसळणारे धबधबे हे कावेरी नदिला जोडणारे आहेत .

त्या नंतर बघायला मिळाल ते निसर्गधाम Forest, जे बांबु च्या व्रुक्षानी दाटलेल आणि अनेक पक्षानी नटलेल.

कुर्ग आणखी एका गोष्टि साठी प्रसिध्द आहे ते म्हणजे इथले मसाले, Coffee Beans, Home Made Wine’s, आणि Home Made Chocolate’s साठी. अश्च्र्याची गोष्ट म्हणजे ह्या वाईन्स मधे Alcohol contains नाही.

अश्या प्रकारे अम्ही इथले मसाले आणि Chocolate’s घेउन अमच्या परतिच्या दिशेने निघालॊ.
परंतू आमचा प्रवास इथेच थांबत नाही, Because this is not a destination.