Thursday, September 6, 2012

महात्मा बसवेश्वर आणि आजचा लिंगायत समाज

          महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाचा आणि लिंगायत समाजाचा सखोल अभ्यास नसतानाही ह्या विषयावर बोलण जरा कठीणच.
कारण महात्मा बसवेश्वर हे नाव  आणि त्यांच्या विचारातून निर्माण झालेला  लिंगायत समाज हे काही आज जन्माला आलेलं नाही हा बाराशे व्या शतकां पासून चालत आलेला इतिहास आहे. मात्र ज्या कारणा साठी आणि जी मनीषा मणात ठेवून बसवेश्वरांनी हि खटाटोप केली होती, आणि हा सर्व उपद्व्याप करण्यासाठी जी काही टीका सहन केली होती तो विचारच आज इतिहास जमा होऊ लागल्याच चित्र दिसतंय. 
महात्मा बसवेश्वरांनी ज्या विचारांवर लिंगायत समाज स्थापन केला तो म्हणजे
"माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो"
हा विचार त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मनाशी घट्ट धरून जात पात गाडत, धर्माच्या भिंती पाडून लिंगायत समाजाची मुहूर्तमेढी रोवली. लिंगायत धर्मात कुठल्याही जातीच्या, व धर्माच्या लोकास येण्यास बंधनं ठेवली  नाहीत,  जातीपातीची बेडी तोडून गळ्यामध्ये शिवलिंग धारण करा आणि माणुसकीचा अर्थ सांगणारा लिंगायत शिव शरण म्हणून वावरा. असा हा सर्वधर्म समभाव सांगणारा सामाज त्या काळात