Thursday, December 30, 2010

राणे नी भरला "सकाळ" ला दम...

         "बालाजी (अ)प्रसन्न, म्हणून `सकाळ'चे शिंतोडे" या मथळया खाली उद्योग मंत्री नारायण राणे यांनी "सकाळ" दैनिकाचा खरापुच समाचार घेणार पत्र "प्रहार" वेबसाइट वर प्रसिद्ध केले आहे

"‘सकाळ’च्या दिनांक 21 डिसेंबर, 2010च्या अंकात ‘इंद्रायणीतील बांधकामांना राणेंचा जाता-जाता वरदहस्त’ या मथळय़ाखाली मुखपृष्ठावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 21 व 22 डिसेंबरला मी कोकणात असल्यामुळे या बातमीसंबंधी खुलासा करू शकलो नाही.  त्यामुळे या खुल्या पत्राच्या रूपाने हा खुलासा करतो आहे." अश्या प्रकारे सुरुवात करत एक मोठ्ठ पत्र त्यांनी सकाळ च्या संपादकाना लिहल आहे.
पत्राच्या शेवटी राणे म्हणतात.....

Tuesday, December 28, 2010

James Lane जिंकला का?

                कोणाला शिव्या येतात का हो शिव्या, इथे लिहिता येत नाही म्हणून, तुम्हाला येत असतील तर लगेच देऊन टाका, पुण्यातल्या भ्याड राज्यकर्त्याना हव्या आहेत.
जागे व्हा...जागे व्हा, आपल अक्कलशून्य आणि स्वार्थी सरकार आपल्याला अंधारी गुफेत घेउन चालले आहे...
आपली भ्रष्टाचाराची कारस्थान लपवण्यासाठी नव नवीन उद्योग सुरु आहेत.
कधी राम, कधी कृष्ण, तर कधी शिवाजी.. अहो तुम्हाला Problem काय आहे ह्यांच्या पासून.
मागे हे सरकार अमेरिकेच्या सांगण्यावरुण हिंद महासगाराताला राम सेतु तोडायला निघाले होते. अमेरिकेने सांगितले की आमच्या बोटी श्रीलंकेला वळसा मारून जातात हजारो लिटर इंधन जळत तुम्ही तो सेतु तोडून टाका आम्हाला Short Cut होइल. आणि "Pizza वाली बाई" (सोनिया गाँधी) तयार झाली, अनेक हिंदुत्ववाद्यानी विरोध केला तर हे म्हणाले "राम म्हणून कोणी नव्हताच ते एक काल्पनिक पात्र आहे" माजी राष्ट्रपति A.P.J.Abdul KAlam ह्यांचा ही सेतु तोडायला विरोध होता. ते म्हणाले या सेतु मधे लाखो टन थोरियम आहे ज्या पासून भारत स्वावलंबी होऊ शकतो. तरी बाई काही येकेना. नशीब बर्याच विरोध आणि अंदोलना नंतर "राम सेतु" वाचला.
         पण आमच्या लाडक्या शिवबा च काय? त्याचा तर अख्खा इतिहासच बदलायला निघाले आहेत, त्याचेच मावले.
कोण्यातरी शोध लावला की म्हणे शिवबा चे गुरु हे "दादोजी कोंडदेव" नव्हते तर ते "संत श्रेष्ठ तुकाराम महाराज" होते. हो आपण हे मान्य ही करू की "संत श्रेष्ठ तुकाराम" हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. पण ते दादोजी सारखे शिवबा ला तलवार, दांडपटटा, कसे शिकवू शकणार? काही तरी logic तर लावा जरा. उगाच दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्याचा द्वेष...

Friday, December 24, 2010

मतांच्या राजकारणात हिंदू झाला बदनाम

कांद्याचा भाव १०० रुपये किलो, लसून ३००, पेट्रोल ६३ रु. लिट, हा भाव सागळयांसाठी सारखा आहे की, हिंदू साठी अलग आणि मुस्लिमान साठी अलग आहे का? नाही ना..! सागळयाना ही झळ सारखीच बसती आहे, "आदर्श" मधले flats हे हिंदू सैनिकाना मिळणार होते की मुस्लिम, CWG मधे हिंदू धावणार होता की मुसमान, 2G Spectrum घोटाळयाची तर आकडेमोड जरी केली तरी "आकडा" येइल.
या सगळया गोष्टीवरुन लक्षात येत की खरच अपल सरकार हे Secular म्हणजेच "धर्मनिरपेक्ष" आहे. कुठल्या ही जाती, धर्माचा विचार ना करता त्यांनी व्यवस्थित पीळवाणुक चालवलेली आहे. सकरकारच ध्येयच आहे की GDP ८% पर्यंत जरी नाही गेला तरी चालेल पण "आम आदमी" हा आमच राहिला पाहिजे. त्याची जर प्रगति झाली तर तो विचार करायला लागेल, आणि विचारी माणस त्याना कधीच मतदान करणार नाहीत.
आता स्वत: च बिंग फुटायला लागले, घरात मवाणार नाही एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार करुन झालय, आणि आता तो "आम आदमी" च्या समोर उघडा पडल्यावर सावरा सावर करण्या ऐवजी, त्याच डोक कस फिरवता येइल, त्याला रिकाम्या कामत कस गुंतवता येइल याची कारस्थान आमच सरकार करतय.
अयोध्या निकाला नंतर परत दंगली तर उसळणार नाही ना, या भीतीत सगळे होते, परंतु सपूर्ण देशात हिंदू व मुस्लिमानी सलोखा राखला, आणि एक वेगळच उदाहरण या जगा समोर ठेवल. परंतु हे या
सरकार ला पचलेल दिसत नाही. प्रतेक वेळेस Bomb Blast होतात कधी मंदिर तर कधी मज्जिद
हदारते तरी सुद्धा हिंदू मुस्लिम भांडत का नाहीत? याची सल त्याना लागलेली दिसत आहे. कारण
आता पुढच्या निवडणुकित हाच मुद्दा त्याना कमी पडणार आहे, कारण विकास तर त्यांनी काही केला नाही, उगाच भ्रष्टाचाराचा डोंगर रचून ठेवला आहे.
आम्ही किती चांगले हे ते जाणतेला दाखउ शकत नाही म्हणून, बाकीचे आमच्या पेक्षा कसे वाईट आहे हे सांगण्यात त्याना जास्त रस वाटतोय.

Saturday, November 27, 2010

वसतिगृहाच्या आठवणी..

       वसतिगृह,  प्रतेकाने जीवनात अनुभवाव अस एक ठिकाण. इथे अनेक ठिकाण ची अनेक व्यक्ति तुम्हाला बघायला मिळतिल. इथे  येणारा प्रत्येक व्यक्ति आपल्या मनात एक नवीन स्वप्न घेवून दखल होतो. स्वप्ना बरोबरच मनात एक भीती ही असते, ती म्हणजे घरापासून दूर रहाण्याची आणि तिथले इतर विद्यार्थी आपल्याशी कसे  वागतील याची. परंतु काही दिवसांनी ही भीती तर दुर होतेच पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत त्यांच्यातलाच एक हिस्सा  झालेलो असतो. नंतर सुरु होतो तो नवीन आयुष्याचा प्रवास नवी स्वप्न नवी आशा उराशी बाळगुण.
प्रत्येक विद्यार्थी इथे एक वेगळच स्वप्न घेवून आलेला असतो इथे आल्यावर त्याच्या स्वप्नाना पंख फुटतात एक दिशा मिळायाला सुरुवात होते. पण कधी कधी काही वेगळच घडत,  एखादा स्वप्न एक बघतो परंतु ध्येय काही तरी निराळ असत आणि खर्या आयुष्यात बनतो मात्र कहीतरी अलगच. पण हे काही असल तरी वसतिगृहाच्या आठवणी आणि अनुभव मात्र जीवनभर सोबत रहातात.
          अश्याच काहिश्या आठवणीनी भरल होत माझही वसतिगृह, आजही जेव्हा ती मस्ती, तो धिंगाना,
आणि ती परिक्षेच्या काळातली स्मशान शांतता आठवाते तेव्हा अंगावर शाहरा उभा राहतो. अस वाटत की अजुनही थोड़ी मस्ती बकिच आहे, जर खरच वेळ थोड़ा मागे घेउन जाता आला असता तर.

Wednesday, November 24, 2010

विदर्भ वेगळाच पडला शेवटी...

                                                                         
विदर्भ वेगळा मागणार्या विदर्भ वाद्यानीच विदर्भाला वेगळ पाडलेल दिसतंय. एक सांगा विदर्भ वेगळा झाल्यावर खरच विदर्भाचा विकास होणार काय? शेवटी विषय उरतो काय तर, कसा हि होवो पण विकास झाला पाहिजे. बर विदर्भ वेगळा झाल्या वरच त्याचा विकास होणार आहे का? तसच असेल तर मग खुशाल होऊन जाऊ द्या, पण याची शास्वती जो घेणार असेल त्याणेच पुढे यावे.
काय तर म्हणे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांना आणणार, त्याची मदत घेतली जाइल नवीन राज्य आणि प्रशाषण स्थापण्यासाठी. आहो ज्याना भारतीय प्रशाषनच मान्य नाही, ज्या गोष्टी विरुद्ध त्याचा लढा आहे त्याच्याच स्थापणे साठी त्याची मदत घेणार, मग खरच विचार करा ते प्रशाषण कस असेल आणि किती दिवस टिकेल? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खरच विदर्भाच्या विकासा साठी विदर्भातील नेते कार्यशील आहेत का?
नुकताच दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावी "आर्णी (यवतमाळ)" गेलो होतो. आमच्या मतदार संघातील नवीनच असलेले पण राजकारणात जुने असलेले मात्तबर असे नेते आमदार म्हणून मिळाले आहेत जे आता सध्या मंत्रिमंडळात मंत्री पद भुषवतायेत मा. शिवाजीराव मोघे, हे आमच्या मतदार संघाला मिळालेलं आत्तापर्यंतच एकमेव मंत्रिपद, पण तेही सध्या डगमगत्या स्थितीत आहे. आजच "सकाळ" मधे बातमी वाचली की "पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जुन्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या किमान दहा चेहऱ्यांना अर्धचंद्र मिळण्याची शक्‍यता आहे. अकार्यक्षमतेमुळे सुभाष झनक, शिवाजीराव मोघे अशा काही नावांचा समावेश मंत्रिमंडळात होणार नसल्याचा अंदाज आहे."
आसाच अकार्यक्षम कार्यभार साधाल्या जात असेल तर कसा होणार विकास.  जर इच्छा आणि दूरदृष्टि

Saturday, October 16, 2010

परकीय भाषेतून कमाई....

भाषेचा उगम हा पाषाण युगा नंतर झाला,
अस मी कुठे तरी वाचल होत. पाषाण युग म्हणजे (Stone age).
आदी-मानव सुरवातीला खानाखुना करुन म्हणजे Sign Language मधे बोलायचा, नंतर हळू हळू संभाषणा साठी भाषेचा वापर होऊ लागला. वेगवेगळ्या जागे नुसार, संस्कृती नुसार त्याचा विकास होत गेला. आज जगात किती तरी भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. बाकी जागाच राहू द्या बाजूला, आपल्या भारतातच बघाना प्रत्येक प्रांतात एक भाषा आणि प्रत्येक ५० किमी. नंतर त्याच भाषेची वेगळीच लय दिसून येते, उदा. महाराष्ट्रात मराठी एकच  भाषा पण किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. विर्भातली "वर्हाडी", कोकणातली "कोकणी,मालवणी", खानदेशातली "खानदेशी मराठी" मराठवाड्यातही एक वेगळाच लय एकायला मिळतो मराठीचा, त्यानंतर येते ती मुंबई ची "बंबईया मराठी", आणि पुण्याची "शुद्ध पुणेरी मराठी" ई.
   जस की मी वर लिहले की भाषेचा वापर हा संभाषणा साठी व्हायचा, आजही त्याच साठी होतो, पण आज त्या व्यतिरिक्त भाषेचा वापर पैसा कमावान्या साठी ही केला जाऊ शकतो. होय, कुठलीही परकीय भाषा शिका आणि "Transalator", "Dictator" म्हणून चांगल्या पगाराचा Job मिळवा. कामित कमी २००००/- हजार दर महा कमाऊ शकता...

Friday, October 8, 2010

झेंडयाचे महायुद्य..

आता नुकत्याच  महानगर पालिकेच्या निवडणुका जाहिर झाल्यात. कल्याण- डोंम्बिवालि महानगर पालिका निवडणुकीच्या बातम्या आपण रोज News Channel वर बघतोच आहोत. निवडणुका म्हटल की राजकीय चिखल फेकिचा गदारोळ सुरु होतो. पण आजकाल ह्याला नवीन रूप आलेल दिसतय, काल पर्यंत राजकारण्यां मधे चढ़ा ओढ़  होती.  आज मात्र पक्षाच्या झेंडया मधून ती दुसून येती आहे.
   सांगायच तात्पर्य आस की, आज राजकीय पक्ष आपल्या कार्य उंचवाण्या पेक्षा आपले झेंडे उंचवाण्यातच मग्न दिसतायेत. तुम्ही मुंबई मधे जाउन बघितलत तर तुम्हाला कळेल की कसा आपल्या पक्षा चा झेंडा दुर्या पक्ष्याच्या झेंड्या पेक्षा उंचवता येइल यातच राजकीय पक्ष जास्त लक्ष घालातायेत.
  ५ वर्षा आधी मी मुंबई ला जेव्हा गेलो होतो तेव्हा दादर हुन पुण्याला येणार्या रस्त्यावर एका चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर भला मोठा असा "भगवा" ध्वज भागितला, आणि त्या भगव्या कड़े बघतच रहवास वाटल, परत कही दिवसा नंतर मुंबई ला जाण्याचा योग आला,बघतो तर काय त्या भगव्या ध्वजा शेजारी मनसे नि आपला तेवढ्याच आकाराचा पण भगव्या पेक्ष्या एक हात उंच झेंडा रोवला होता. सुरवातीला जेव्हा बघितल तेव्हा डोक्यात

Thursday, October 7, 2010

महाराष्ट्रा बाहेरील बाळ ठाकरे...

              महाराष्ट्राची एकमेव ओळख, एकमेव अभिमान म्हणजे,
"छत्रपति शिवाजी महाराज". महाराजांनी रक्ताच पाणी करुन महाराष्ट्राची बाग़ फुलवली, जो महाराष्ट्र देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सर्वोतपरी प्रबळ ठरला होता. पण मध्यंतरिच्या काळात प्रतेका साठी आपली दारं  उघडी करुन देणारा महाराष्ट्र अनेकांच्या रंगात, रंगता-रंगता स्वतः चा रंग विसरायला लागला होता. परत गरज होती ती मराठी चा स्वाभिमान जागवण्याची, मराठी माणसाला एकत्र आणण्याची आणि ते काम घडल माननीय शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या कडून, पण त्याच बरोबर त्यांच्या वर बरीच टिका ही झाली. आजही बरीच महाराष्ट्रातलीच मराठी माणस त्यांच्यावर टिका करायला मागे पुढे पाहत नाहित.
        पण याच्याच उलट जेव्हा आपण महाराष्ट्रा बाहर जातो, तेव्हा महाराजां नंतर महाराष्ट्रा ची ओळख होते ती बाळा साहेब ठाकरे यांच्या नावानेच. मग ते बाहेरील प्रांतात असो की देशात, महाराष्ट्रा बाहर जेव्हा जातो तेव्हा साहजिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "Where are you from?"  महाराष्ट्र अस सांगितल्या वर "बाळ ठाकरे" असा काहीतरी reply  त्याच्या कडून मिळतो. काल पर्यंत ज्यांना
आपण महाराष्ट्रात राहून Fundamentlist म्हणत होतो आचानक आपण त्यांचे गुणगान गायला लागतो. त्या प्रांतात गेल्या नंतर तिथल्या लोकांच त्याच्या मात्रुभाषेवारिल वरील आणि त्यांच्या संस्क्रुतिवरिल प्रेम पाहून बाळा साहेबांच्या गोष्टी मनाला पटायला लागतात.

Monday, October 4, 2010

माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास...


Bangalore कर्नाटकाची राजधानी, आणि भारताची Sillicon City.

म्हणजे IT Companies च माहेर घर, बरेच दिवसा पासून इच्छा होती तीथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीच हि नाही,
आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती एकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्या शिवाय पर्याय हि नव्हता, पण ते म्हणतात ना "सब्र का फल मीठा होता है." आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला Banglore ला पठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिण्यासाठी.
मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).
पुणे ते Bangalore प्रवास
सकाळी १० वाजता  office मधून टिकिट  collect  करुन सरळ पुणे Station  ला पोहचलो, उद्दान Express लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगले आणि टिकिट एकाकडेच...

Tuesday, August 17, 2010

कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे..

आज कवितेचा महासूर्य मावळला, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या वरील हा लेख सामना दैनिकात आलाय...
1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले.
दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार. मग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी नारायण सुर्वे यांचा संघर्ष सुरू झाला. एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्‍या, कुणाचे कुत्रे, तर कुणाची मुले सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीतच ते वाढले. गोदरेजच्या कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑईलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीतही काम केले.

Sunday, August 15, 2010

तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)


आज १५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस, १९४७ साली लाल किल्यावर पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी तिरंगा फ़डकवला आजही फ़डकवला व पुढे ही असाच फ़डकत रहाणार.
१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "

Sunday, August 8, 2010

आता आपलं सरकार आलंय.....

आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।











सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।

रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।

आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।

पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।

तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।

Tuesday, August 3, 2010

गृहमंत्री म्हणाले......

बेळगाव सीमा प्रश्नावर गेल्या बर्याच दिवसापासून महाराष्ट्र व करनाटकात द्वंद युद्ध सुरु आहे. आज लोकसभेत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावरून जोरदार गोंधळ झाला . महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार उभे राहिले. महागाईची चर्चा होण्याआधी बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा व्हावी , असा आग्रह महाराष्ट्रातील खासदारांनी धरला . काही दिवसा आधी याच मुद्यावर आपल्या ग्रुहमंत्री साहेबांच एक मजेदार stament वचायला मिळाल होत.
"प्रश्न् सोडवायचा नसेल तर समिती नेमली जाते, तो लांबवायचा असेल तर आयोग नेमला जातो, तो ताणायचा असेल तर कोर्टात धाव घेतली जाते. सीमाप्रश्नचेही नेमके तेच झाले असे सांगून गृहमंत्री म्हणाले कीं, या प्रश्नच्याबाबतीत केंद सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिकाही स्पष्ट करीत नाही."
या सिंहावलोकन परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून व्यक्त झालेल्या विचारातून जो दस्तऐवज निर्माण होईल तो राज्य सरकारसाठी होकायंत्र ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आता फक्त बघायच आहे की नेमका राजकारणी हां मुद्दा किती दिवस चघळतात ते...

नोंटांवर Expiry Date and Bar-Code…

आज भ्रष्टाचाराचा भस्मासुर आ वसुन बसला आहे. काहि दिवसा आधीच पेपर मधे वाचल होत कि नगर चे साहायक कामगार आयुक्त माहगाई वाढली म्हणुन लाच दुप्पट घेत आहेत. काय सालं समिकरण आहे.
आहो, एकदाचं भाजीपाल्याची,पेट्रोल,डीझेल ची माहगाई कमी करा म्हणुन आंदोलन करता येईल, पण ह्या माहगाई काय?
आता सामान्य माणसाला लाच देणं सुध्दा परवडणार नाही. आता काम कशी होणार सामन्य माणसांची, कारण लाच दिल्याशीवास काम सुध्दा होत नाही आमच्या भारतात.
तस बघीतल तर आपला भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. आपल्या देशात चिक्कार पैसा आहे, पण नेमका तो आहे कुठे, आणि  तो कोणी, कुठे आणि कसा लपवला आहे हेच कळत नाही. ह्याचे धागेदोरे कोणालाच सापडत नाही. खर म्हणजे सापडत नाही म्हणण्या पेक्षा सापडु दिले जात नाहीत, फ़ारच कोणी प्रयत्न केलाच तर तो काळा पैसा सरळ जातो Swiz बैंक मधे, म्हणजे कटकटचं नको.
बरं, मागच्या निवडनुकीत भाजपाने मोठ्या तोय्रात सांगितल होत कि आम्ही निवडुन आल्यावर सगला काळा पैसा परत देशात आनु. मग आता काय झालय, तुमच सरकार आल नाही म्हणुन तुम्ही या कल्पनेला मुठ-माती तर दिली नाहीत ना? देशहीतासाठी तुम्ही तुमची ही कल्पना सरकार कडे मांडु शकता. कि, या गोष्टीच श्रेय स्वतः ला घेता याव म्हणुन अजुन सत्ता येई पर्यंत देशाच नुकसान बघत राहाणार आहात काय?
खंरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि, कसा हा पैसा वाचवला जाऊ शकतो, हा पैसा आपल्याच अर्थव्यवस्थेतच खेळावा या साठी काही उपाय योजना येवु शकतील का? एक केल जाउ शकत, "जर प्रत्येक नोटांवर एक काळापुअरती Expiry Date टाकली तर!" खरचं कल्पना अजीबात वाईट नाही जर खरचं अशा गोष्टींचा वापर झालाच तर अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडुन येईल.
मि तर म्हणतो कि फक्त Expiry Date च नाही तर प्रत्येक नोटांवर Bar-code छापण्याची व्यवस्था करावी म्हणजे पुर्णपणे electronic नोट प्रत्येक नोटीचा Database देशातला प्रत्येक बन्का जवळ म्हणजे खोट्या नोटांवर सुद्दा बराच आळा बसेल. Australian Fiber वापरुन नोटा बनवण्याच्या कल्पनेपेक्षा ही कल्पना केव्हाही स्वस्त व सुरक्षीत असेल, जर या कल्पनेवर व्यवस्थीत विचार केला गेला व Expertise बसवुन याचा अवलंब करण्यात आला तर काळा पैश्यावर आळा बसेल Income tax बुडवणार्यावर, खंडणी घेणार्यावर सुद्दा प्रत्येकाला expiry date च्या आधी नोटा bankeत जमा कराव्या लागतील व expiry date वाढवुन घ्यावी लागेल आसं झालचं तर मला नाही वाटत आपल्याला २०२० ची वाट बघावी लागेलं.