Thursday, October 7, 2010

महाराष्ट्रा बाहेरील बाळ ठाकरे...

              महाराष्ट्राची एकमेव ओळख, एकमेव अभिमान म्हणजे,
"छत्रपति शिवाजी महाराज". महाराजांनी रक्ताच पाणी करुन महाराष्ट्राची बाग़ फुलवली, जो महाराष्ट्र देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सर्वोतपरी प्रबळ ठरला होता. पण मध्यंतरिच्या काळात प्रतेका साठी आपली दारं  उघडी करुन देणारा महाराष्ट्र अनेकांच्या रंगात, रंगता-रंगता स्वतः चा रंग विसरायला लागला होता. परत गरज होती ती मराठी चा स्वाभिमान जागवण्याची, मराठी माणसाला एकत्र आणण्याची आणि ते काम घडल माननीय शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या कडून, पण त्याच बरोबर त्यांच्या वर बरीच टिका ही झाली. आजही बरीच महाराष्ट्रातलीच मराठी माणस त्यांच्यावर टिका करायला मागे पुढे पाहत नाहित.
        पण याच्याच उलट जेव्हा आपण महाराष्ट्रा बाहर जातो, तेव्हा महाराजां नंतर महाराष्ट्रा ची ओळख होते ती बाळा साहेब ठाकरे यांच्या नावानेच. मग ते बाहेरील प्रांतात असो की देशात, महाराष्ट्रा बाहर जेव्हा जातो तेव्हा साहजिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "Where are you from?"  महाराष्ट्र अस सांगितल्या वर "बाळ ठाकरे" असा काहीतरी reply  त्याच्या कडून मिळतो. काल पर्यंत ज्यांना
आपण महाराष्ट्रात राहून Fundamentlist म्हणत होतो आचानक आपण त्यांचे गुणगान गायला लागतो. त्या प्रांतात गेल्या नंतर तिथल्या लोकांच त्याच्या मात्रुभाषेवारिल वरील आणि त्यांच्या संस्क्रुतिवरिल प्रेम पाहून बाळा साहेबांच्या गोष्टी मनाला पटायला लागतात.

Monday, October 4, 2010

माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास...


Bangalore कर्नाटकाची राजधानी, आणि भारताची Sillicon City.

म्हणजे IT Companies च माहेर घर, बरेच दिवसा पासून इच्छा होती तीथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीच हि नाही,
आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती एकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्या शिवाय पर्याय हि नव्हता, पण ते म्हणतात ना "सब्र का फल मीठा होता है." आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला Banglore ला पठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिण्यासाठी.
मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).
पुणे ते Bangalore प्रवास
सकाळी १० वाजता  office मधून टिकिट  collect  करुन सरळ पुणे Station  ला पोहचलो, उद्दान Express लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगले आणि टिकिट एकाकडेच...

Tuesday, August 17, 2010

कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे..

आज कवितेचा महासूर्य मावळला, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या वरील हा लेख सामना दैनिकात आलाय...
1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले.
दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार. मग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी नारायण सुर्वे यांचा संघर्ष सुरू झाला. एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्‍या, कुणाचे कुत्रे, तर कुणाची मुले सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीतच ते वाढले. गोदरेजच्या कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑईलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीतही काम केले.

Sunday, August 15, 2010

तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से (१५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस)


आज १५ अगस्त देशाचा ६४ वा स्वतंत्र दिवस, १९४७ साली लाल किल्यावर पहिल्यांदा आपल्या नेत्यांनी तिरंगा फ़डकवला आजही फ़डकवला व पुढे ही असाच फ़डकत रहाणार.
१५ औगस्ट आला कि मला माझ लहानपण आणि शाळेचे दिवस आठवतात. ते लवकर लवकर उठुन छानसा पांढरा शुभ्र uniform घालुन सकाळी सकाळी शाळेत जायच, ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहन, सगळी लहान मंडळी एका रांगेत चपटासा भांग पाडुन ऊभी असलेली ध्वजाला Salute करत "जण-गण-मण" म्हणायची व N.C.C. ची परेड व्हायची.
आम्ही सगळे मांडी घालुन बसायचो नंतर पहुण्यांच भाषण व आमच्यातल्याही काही लाहाणग्याची भाषणेही होत.
ही सगळी कर्यक्रम आटोपल्यावर सगळ्याना गोळ्या, बिस्किटांचे वाटप व्हायचं, आणि लगेच सुटी मग काय धावत धावत घरी जायच, जात असतांना हातात एक छोटा तिरंगा आणि तोंडात एखाद देश्भक्तीच गाण गात घराकडे जात तिरंगामय झालेल गाव बघत जातांना अगांवर शाहारे येत, जिथे तिथे देशभक्तीपर गाण्याचे आवज येकु येत. दिवसभर उनाडक्या करुन घरी आल्या नंतर टि.व्ही. वर सुध्दा देशभक्तीपर चित्रपट सुरु असायचेत. हतात तिरंगा, गावागावात सगळी कडे तिरंगा आणि टि.व्ही. वरही नाना पाटेकरचा तिरंगा, त्यातला राज कुमार चा संवाद आठवतो "ना तलवार की धार से, ना गोलीओकी बरसात से, बंदा डरता है तोह सिर्फ़ परवर्दिगार से "

Sunday, August 8, 2010

आता आपलं सरकार आलंय.....

आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।











सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।

रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।

आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।

पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।

तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।