Sunday, August 8, 2010

आता आपलं सरकार आलंय.....

आपल्या Blog चे नियमित वाचक, माझे एक मित्र यांनी आपल्या सरकार बद्दल चा आपला आनंद कही अश्या प्रकारे व्यक्त केला आहे।











सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंयसगळं होणार..... ।। धृ ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु।, तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत१० वर्षांत जे करता आले नाही
ते २ वर्षांत करणार,दिवसभर वीज जाणार,
रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।

रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।

आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।

पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।

तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।

Tuesday, August 3, 2010

गृहमंत्री म्हणाले......

बेळगाव सीमा प्रश्नावर गेल्या बर्याच दिवसापासून महाराष्ट्र व करनाटकात द्वंद युद्ध सुरु आहे. आज लोकसभेत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावरून जोरदार गोंधळ झाला . महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार उभे राहिले. महागाईची चर्चा होण्याआधी बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा व्हावी , असा आग्रह महाराष्ट्रातील खासदारांनी धरला . काही दिवसा आधी याच मुद्यावर आपल्या ग्रुहमंत्री साहेबांच एक मजेदार stament वचायला मिळाल होत.
"प्रश्न् सोडवायचा नसेल तर समिती नेमली जाते, तो लांबवायचा असेल तर आयोग नेमला जातो, तो ताणायचा असेल तर कोर्टात धाव घेतली जाते. सीमाप्रश्नचेही नेमके तेच झाले असे सांगून गृहमंत्री म्हणाले कीं, या प्रश्नच्याबाबतीत केंद सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिकाही स्पष्ट करीत नाही."
या सिंहावलोकन परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून व्यक्त झालेल्या विचारातून जो दस्तऐवज निर्माण होईल तो राज्य सरकारसाठी होकायंत्र ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आता फक्त बघायच आहे की नेमका राजकारणी हां मुद्दा किती दिवस चघळतात ते...

नोंटांवर Expiry Date and Bar-Code…

आज भ्रष्टाचाराचा भस्मासुर आ वसुन बसला आहे. काहि दिवसा आधीच पेपर मधे वाचल होत कि नगर चे साहायक कामगार आयुक्त माहगाई वाढली म्हणुन लाच दुप्पट घेत आहेत. काय सालं समिकरण आहे.
आहो, एकदाचं भाजीपाल्याची,पेट्रोल,डीझेल ची माहगाई कमी करा म्हणुन आंदोलन करता येईल, पण ह्या माहगाई काय?
आता सामान्य माणसाला लाच देणं सुध्दा परवडणार नाही. आता काम कशी होणार सामन्य माणसांची, कारण लाच दिल्याशीवास काम सुध्दा होत नाही आमच्या भारतात.
तस बघीतल तर आपला भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे. आपल्या देशात चिक्कार पैसा आहे, पण नेमका तो आहे कुठे, आणि  तो कोणी, कुठे आणि कसा लपवला आहे हेच कळत नाही. ह्याचे धागेदोरे कोणालाच सापडत नाही. खर म्हणजे सापडत नाही म्हणण्या पेक्षा सापडु दिले जात नाहीत, फ़ारच कोणी प्रयत्न केलाच तर तो काळा पैसा सरळ जातो Swiz बैंक मधे, म्हणजे कटकटचं नको.
बरं, मागच्या निवडनुकीत भाजपाने मोठ्या तोय्रात सांगितल होत कि आम्ही निवडुन आल्यावर सगला काळा पैसा परत देशात आनु. मग आता काय झालय, तुमच सरकार आल नाही म्हणुन तुम्ही या कल्पनेला मुठ-माती तर दिली नाहीत ना? देशहीतासाठी तुम्ही तुमची ही कल्पना सरकार कडे मांडु शकता. कि, या गोष्टीच श्रेय स्वतः ला घेता याव म्हणुन अजुन सत्ता येई पर्यंत देशाच नुकसान बघत राहाणार आहात काय?
खंरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि, कसा हा पैसा वाचवला जाऊ शकतो, हा पैसा आपल्याच अर्थव्यवस्थेतच खेळावा या साठी काही उपाय योजना येवु शकतील का? एक केल जाउ शकत, "जर प्रत्येक नोटांवर एक काळापुअरती Expiry Date टाकली तर!" खरचं कल्पना अजीबात वाईट नाही जर खरचं अशा गोष्टींचा वापर झालाच तर अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडुन येईल.
मि तर म्हणतो कि फक्त Expiry Date च नाही तर प्रत्येक नोटांवर Bar-code छापण्याची व्यवस्था करावी म्हणजे पुर्णपणे electronic नोट प्रत्येक नोटीचा Database देशातला प्रत्येक बन्का जवळ म्हणजे खोट्या नोटांवर सुद्दा बराच आळा बसेल. Australian Fiber वापरुन नोटा बनवण्याच्या कल्पनेपेक्षा ही कल्पना केव्हाही स्वस्त व सुरक्षीत असेल, जर या कल्पनेवर व्यवस्थीत विचार केला गेला व Expertise बसवुन याचा अवलंब करण्यात आला तर काळा पैश्यावर आळा बसेल Income tax बुडवणार्यावर, खंडणी घेणार्यावर सुद्दा प्रत्येकाला expiry date च्या आधी नोटा bankeत जमा कराव्या लागतील व expiry date वाढवुन घ्यावी लागेल आसं झालचं तर मला नाही वाटत आपल्याला २०२० ची वाट बघावी लागेलं.

Wednesday, December 2, 2009

निखिल वागळे जरा साभांळुन......

झी मराठि वरील आमने-सामने या वाद-विवादाच्या कार्यक्रमातुन अधीकच प्रसिद्धीत आलेले निखिल वागळेंवर नुक्तिच शिवसेने कडुन पुष्प सुमने उधळल्या गेली आहेत. अहो म्हणजे मार खालायं, बाळासांहेबांवर उटसुट उलटसुलट व्यक्तव्य केल्या कारणाने हा प्रकार घडला. प्रत्येकाशी तडकाफडकी सरळ भाषेत बोलणारा माझा एक आवडता पत्रकार म्हणुन मि त्यांना पाहतो. परंतु कधी कधी खरचं फारच अती करताहो वगळे साहेब वटवट तुम्ही. हल्ला झाल्या नंतर पेटुन उठलेल्या निखिल वागळेंनी लगेचच संपुर्ण पत्रकार यंत्रणेला डोक्यावर घेउन आपण किती शक्तीशाली आहोत हे दाखवण्यासाठी आकांत-तांडव सुरु केला. लोकांनां आपण किती भोळे व आपल्यावर कसा शिवसेनेने अन्याय केला हे दाखवण्याचा आटा-पिटा सुरु केला. लोंकान कडुन exit poll मागितलेत, बिध्द्दास्त बोला कार्यक्रमात मते विचारले असता, त्यांची मते एकण्या एवजी स्वःताचिच वटवट अधिक होती. ति होणारच म्हणा कारण ४८ तासांच्या आत सरकारने शिवसेनेवर कारवाई कारा नाहीतर आम्ही शांत बसणार नाहीत आमची ताकद दाखवु म्हणनार्या वागळेंना एका प्रेक्षकांने एक सुंदर प्रश्न विचारुन शांत बसवल तो म्हणजे "४८ तासात कारवाई झाली नाही तर सरकार वर दबाव आणु म्हणता, आज तुमच्यावर हल्ला झाला म्हणुन ताकद आठवली, तेव्हा का सरकारवर दबाव टाकला नाही जेव्हा मुम्बंई वर हमला झाला, सरकारने त्यांना लवकरात लवकर फासी द्यावी म्हणुन का ही ताकद वापरत नाही तुम्ही? " प्रश्न एकुन गप-गार झालेले वागळे लगेचच विषयांतर करु लागलेत.
या सर्व प्रकारामुळे काही आधिक महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात, या आधी महानगर दैनीकासाठी काम करणार्या वागळेंबरोबर त्यांचे साथिदार कपिल म्हणुन होते. त्यांनी दै. पुण्य नगरी मधे वागळेंच्या जुन्या कट कारस्थानांचा एक उत्तम लेख लिहला आहे जरुर वाचा. त्यातुन अस कळत की शिवसेनेशी त्यांच जुनच वैर आहे. कपिलजींच्या म्हणण्यानुसार त्या वेळेस महानगर दैनिकाचा विरोध म्हणुन तो जाळण्याचा ऊपक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. याला घाबरुन वागळेंनी त्यावेळचे शिवसेनेचे नेते विठ्ठल चव्हाण व छगन भुजभळ (ते तेव्हा शिवसेनेत होते.) यांची मदत घेतली, ती मदत करत असतांना विठ्ठल चव्हाण येवठं हि म्हणाले कि जाउ द्या शेवटी मराठी माणुस आहे कशाला त्याच नुकसान करायच. परंतु शिवसेनेच्या भाषेत बोलायच झाल तर या ऊपर्यानी त्यांच विठ्ठल चव्हाणांच्या म्रुत्यु नंतंर ते गुंड होते असं ठरवुन विधानसभेत कशाला त्या साठी श्रध्दांजली वाहता हि नैतिकता आमदारांना शिकवण्याचा शाहाणपना यांनी केला होता. म्हणुन म्हणतोय वागळे साहेब जरा जपुनच बोला नाहीतर उगाच जनमाणसात पेटेल तुमच्या विरुध्द रणसंग्राम.................
उद्या तुमच्यावरच होईल हल्ला बोल.................

राऊतांना आलाय ऊत.............

गेल्या काही दिवसापासुन सामना मधे जे लेख बाळा साहेबांचे म्हणुन खपवले जात आहेत ते वाचुन आपल्या सारख्या सामान्य माराठी माणसांनी काय प्रतीक्रिया द्यावी हेच कळत नाही. कधी मराठी माणसांनिच पाठीत खंजीर खुपसला काय! तर कधी सचीन सारख्या महान क्रिकेट पटुवर सडकुन टिका. आणि महत्वाच काय तर तोही एक मराठी माणुस असतांना. बाळासाहेब आता ८०+ वर्षाचे झाले आहेत. मला तर वाटत आता ते या गोष्टीत लक्षही घालत नसतील. तस पहीले पासुन त्यांचा लाडका संजय ज्याला ते संज्या म्हणातात तेच सामनाचा कारभार पाहतात. मात्र आता संजय राऊतांनी जे काही सामनाचा आडोसा घेवुन चालवलय ते खरचं टिकेस पात्र आहे. संजय राऊत साहेब आपणास आमची नम्र विनंती आहे क्रुपया या सगळ्या गोष्टी जरा कमी करा सामन्य़ जणता व शिवसैनिकांना संभ्रमात आणु नका. त्यानंतर निखिल वागळेंवर हल्ला, हे प्रकरण वादाचच, ते बरोबर की चुक यात लक्ष न घातलेलच बरं, निखिल वागळे खरं तर माझे आवडते पत्रकार, परंतु त्यांची काहीच चुक नाही असंही मि म्हणत नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही........
तरीही राऊत साहेब आपल्याला उगाच ऊत येवु देवु नका. पहीलेच मनसे मुळे बराच धक्का बसलाय त्यातुन सावरुन मराठी माणसांसाठी काम करणारी मराठी माणसांची आपली शिवसेना असा लैकीक परत पोहचवण्यासाठी धडपडण्या ऎवजी, मराठी माणसावरच हल्ले, जरा आवर घाला............