Friday, October 23, 2009

रणसंग्राम विधानसभेचे


चला लोकशहीतील आणखि एक उत्सव पार पडला. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २००९ यातही परत निवडुन आली ति म्हणजे आघाडी. ६००० हुन जास्त शेतकरी आत्महत्तेच पातका सहीत,लोड शेडींग,माहागाई,२६/११ सारखे हल्ले, आणि ई महत्वाची पातक आपल्या डोक्यावर घेवुन हा आघाडी रुपी रावण परत या सोन्याहुन मौलवान माहाराष्ट्राला स्वतःच्याच शेपटीने पेटवत आलाय व पेटवत राहाणारच याची शपथ घेवुन आपली पुठची वाटचाल येत्या दिवसात सुरु करणार. आणि यांच बरोबर बरेचसे बुद्धीवादी म्हणवणारे रिकामटेकडे लोक आता यावर गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या चर्चा करतांना प्रत्येक News Channel वर आढळतील. काल प्रर्यंत याच आघाडीला शिव्या घालणारे आता त्यांना शुभेच्छा देतांना व त्यांच्या पुढे लाळ गाळतांना आपल्याला दिसतील.
लाहाणपणि एक म्हण ऎकली होती ति म्हणजे "दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ" ति खरीखुरी या निवडनुकीत बघायला मिळाली. शिवसेना-मनसे भांडणात मग्न दिसलीत ज्याची आजीबात गरज नव्हती! का ते सांगतो पुढे, पण भाजपाला मात्र माणाव लागेल, लगेच आपल्या अपयशाच घापर ईतरांवर फोडुन मोकळी झाली आहे. आता ह्याना विचारमंथनाची गरज नाही कारण उत्तर सरळ सरळ समोर आहे युतीने मनसेशी उगाच भांडत बसण्यापेक्षा त्यानी आघाडीचा पर्दाफाश करण्यात वेळ खर्ची

शिवसेनेचे call center…..

भारतिय राजकारणाच्या ईतिहासात पहील्यांदा प्रत्येक सामाण्य माणसा पर्यंत त्यांच सरकार कसं पोहचु शकेल यांचि व्यवस्थित हाताळणि शिवसेनेनि केलेलि दिसतेय. त्यांनि सुरु केलयं call center, होय, ईथे तुम्हि तुमच्या भागातल्या समस्या १ call करुन सांगु शकता किंवा त्यांच्या वेबसाइट वर जावुन सुद्दा त्या नोंदवु शकता. जसे कि कचर्याशि निगडीत समस्या, आरोग्याशी निगडीत समस्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतिशि निगडीत प्रश्न, हे व अश्या अनेक समस्यांचि त्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावलि जाते. व ति समस्या ज्या विभागातुन नोंदवली जाते त्या विभागातिल विभागप्रमुख व शाखाप्रमुखाशी संपर्क साधुन त्यांच्या कार्यकर्तांकडुन ति समस्या तातकाळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या समस्येंचा व कार्याचा report कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे व ईतर महत्वांच्या नेत्यांपर्यंत हमखास पोहचतो. ज्यामुळे कामात दिरंगाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.असा हा अत्भुत प्रयत्न सुरु तर झालाय परंतु तो फक्त शिवसेना भवन पुरताच. त्याला विधान भवनात राबवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु हे स्वप्न भंगणार मात्र नाही नक्किच लवकरात लवकर ते पुर्ण होईल.

संविधानातिल सर्वोच्च पद















save earth



थोडीशी माहीति आपल्या भारतिय राजकारणातिल महत्वाच्या पदांची.
भारत स्वातंत्र झाला तेव्हा पासुन आज पर्यंत भारतिय संविधानातिल सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपति व प्रधानमंत्री पद,हि पदे भुषवलेल्या व्यक्तींची नावे व कार्यकाळ आपण खाली बघुयात……………………

Sunday, September 27, 2009

अहींसावादी हींसा करतात तेव्हा?

अहींसेचे देवता मा. गांधी व त्यंच्यांच विचारांवर उभारलेला त्यांचा पक्ष कोग्रेस, हा यांचे विचार व अहींसावाद संपुष्टात आणतांना दिसतोय. कारण, अश्या भरपुर घटना या दीवसात आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला आठवत आसेल तर काही महीन्याआधी सोनिया बाईंच्या सभेत विलासराव देशमुख व बांईन विरुद्ध काहींनी नारे बाजी केली तेव्हा त्यांना कार्यकर्त्यानी चांगलाच चोप दिला, व सोनिया बाई त्यांना चोप देवुन झाल्यावर म्हणाल्या "छोड दो उन्हे जाने दो", दुसरी घटणा झाली ति होती विलासरावांर त्यांच्या सभेत गोमुत्र फेकुन विरोध दर्शिविनार्या युवकासही चागंलाच चोपला होता. त्या नंतर आता राणे, सरवणकर यांनी निवडुक अर्ज भरायच्या दिवशी आदेश बांदेकर व त्यांच्या सहकारी शिवसॆनिकांबरोबर हातापायी केली, खरं पाहाता आचार संहीतेचा भंग राणेनी करुनही तेच वरचठ बोलत होते. तस पाहाता या फारच लाहान साहान घटना आहेत, कारण ईदींरा गांधींच्या हत्येच्या वेळी सगळ्यात जास्त सिख(सरदार) मारलेत ते या कोग्रेसनेच, आता परत एक घटना घडली

Thursday, September 24, 2009

विदर्भ म्हटलं कि ?

विदर्भ म्हटलं कि आठवत ते फक्त शेतक-यांची आत्महत्या, दुष्काळ, तपतं उन्हं,आणि कुपोषण. खरचं येवठ्यातच सामावलय का हो विदर्भ? नाही, जिच्या पोटी शिवबा जन्मला, जिच्या संस्कारामुळे त्याने महाराष्ट्र घडवला, ति जिजाऊ विदर्भाने दिली, अशिच एक विदर्भ कन्या जिने श्रिक्रुष्णाचा संसार फुलवला ती रुख्मिणिमाता, हे आणि या पेक्षाही ईथे बरचं काही आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक विभ्भिन्न अंग आहे. महाराष्ट्राचा पुर्व भाग व देशाच्या मध्यभागी आसलेला प्रदेश विदर्भ म्हणुन ओळखला जातो. विदर्भ हा दोन भागात विभागलेला आहे. नागपुर आणि अमरावती विभाग, नागपुर,अमरावती,अकोला ही विदर्भातील सगळ्यात मोठी महत्वाची शहरं आहेत. ही झाली विदर्भाची प्रार्थमिक माहीती, आता बघुया काय खास आहे विदर्भात?
विदर्भाचा इतिहास:
भगवान श्रीक्रुष्णाला भुरळ घालणारी त्यांची पट्टराणी माता रुख्मिणि ही विदर्भ कन्या, रुख्मिणि हरणाची ऎतिहासिक घटणा विदर्भातील उम्रावतीत(सध्याचे अमरावतीत) घडली, विदर्भातिल राजघराण्यांची वंशवाळ फार मोठि आहे. भिष्मक राजा त्याचा पुत्र दक्ष,त्यांचे वंशज बुद्धभानू हलदर,पछाकर,रिमुपमर्दन,चित्रसेन,भिम,दम्मनंद,भोज,क्रम आणि कौशिक हे भाऊ क्रम चा नातु भिष्मक व त्याचि मुलगी रुख्मिणि. त्यानंतर १८ व्या शतकातकाआधी नागपुर ही भोसल्यांची राजधानी होती. नंतर स्वातंत्रसग्रामातही विदर्भाने वेगळ स्थान बनवल. विदर्भातील सेवाग्राम गांधीवाद्यांसाठी राजधानी होती. स्वातंत्रा नंतर विदर्भ मुबंई महाराष्ट्रात विलिन झाला.
भौगोलिक:सातपुडाच्या पर्वत रांगा विदर्भा जवळ आहे पण मोठ्या प्रमाणात टेकड्या ईथे आढळत नाही. ऎथील मेळघाट जंगल व चिखलदरा हे प्रेक्षनिय स्थळे आहेत. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सुद्धा पाहाण्या सारखं आहे. जगातील आश्चर्य असणारे खारं पाण्याच सरोवर बुलठाणा जिल्हात लोणार ईथे आहे. वैनगंगा हि सगळ्यात मोठि नदी आहे.