Tuesday, August 3, 2010

गृहमंत्री म्हणाले......

बेळगाव सीमा प्रश्नावर गेल्या बर्याच दिवसापासून महाराष्ट्र व करनाटकात द्वंद युद्ध सुरु आहे. आज लोकसभेत महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावरून जोरदार गोंधळ झाला . महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे खासदार उभे राहिले. महागाईची चर्चा होण्याआधी बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा व्हावी , असा आग्रह महाराष्ट्रातील खासदारांनी धरला . काही दिवसा आधी याच मुद्यावर आपल्या ग्रुहमंत्री साहेबांच एक मजेदार stament वचायला मिळाल होत.
"प्रश्न् सोडवायचा नसेल तर समिती नेमली जाते, तो लांबवायचा असेल तर आयोग नेमला जातो, तो ताणायचा असेल तर कोर्टात धाव घेतली जाते. सीमाप्रश्नचेही नेमके तेच झाले असे सांगून गृहमंत्री म्हणाले कीं, या प्रश्नच्याबाबतीत केंद सरकार वेळकाढूपणा करत आहे. नेमकी भूमिकाही स्पष्ट करीत नाही."
या सिंहावलोकन परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासू व्यक्तींकडून व्यक्त झालेल्या विचारातून जो दस्तऐवज निर्माण होईल तो राज्य सरकारसाठी होकायंत्र ठरेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
आता फक्त बघायच आहे की नेमका राजकारणी हां मुद्दा किती दिवस चघळतात ते...

No comments: