Sunday, September 27, 2009

अहींसावादी हींसा करतात तेव्हा?

अहींसेचे देवता मा. गांधी व त्यंच्यांच विचारांवर उभारलेला त्यांचा पक्ष कोग्रेस, हा यांचे विचार व अहींसावाद संपुष्टात आणतांना दिसतोय. कारण, अश्या भरपुर घटना या दीवसात आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला आठवत आसेल तर काही महीन्याआधी सोनिया बाईंच्या सभेत विलासराव देशमुख व बांईन विरुद्ध काहींनी नारे बाजी केली तेव्हा त्यांना कार्यकर्त्यानी चांगलाच चोप दिला, व सोनिया बाई त्यांना चोप देवुन झाल्यावर म्हणाल्या "छोड दो उन्हे जाने दो", दुसरी घटणा झाली ति होती विलासरावांर त्यांच्या सभेत गोमुत्र फेकुन विरोध दर्शिविनार्या युवकासही चागंलाच चोपला होता. त्या नंतर आता राणे, सरवणकर यांनी निवडुक अर्ज भरायच्या दिवशी आदेश बांदेकर व त्यांच्या सहकारी शिवसॆनिकांबरोबर हातापायी केली, खरं पाहाता आचार संहीतेचा भंग राणेनी करुनही तेच वरचठ बोलत होते. तस पाहाता या फारच लाहान साहान घटना आहेत, कारण ईदींरा गांधींच्या हत्येच्या वेळी सगळ्यात जास्त सिख(सरदार) मारलेत ते या कोग्रेसनेच, आता परत एक घटना घडली
 आहे ति महाराष्ट्रात (अक्कलकोट)भाजपाच्या सभेत कोग्रेस कार्यकर्त्यांनी गोळिबार करुन एक ठार तर आनेकानां जखमि केलयं. या अश्या दळभद्री घटना निवडनुकीआधी बिहार मधे घडतात, तेच आता महाराष्ट्रात होत आहे. जर का या अश्याच अहींसावादी हिंसकांची आपल्यावर "क्रुपा (शंकर)" राहली तर लवकरच महाराष्ट्रात हे सिंग घुसवुन आपल्याला घायाळ करतील. व महाराष्ट्राचा यु.पि. बिहार करतील. अजुनही वेळ गेली नाही जागे व्हा! काढुन फेकुया हे अहींसेचे मुखवटे या हिंसकांच्या चेहर्यावरुन.....
पेटु द्या रणसंग्राम हल्ला बोल.........



1 comment:

Ashish said...

Kharach khup wichar karayala lawnara lekh ahe ha. kami shbdat khup kahi bolun gela ahe lekhak ithe.

ashish